कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ : गणेश चप्पलवार
शेतीपूरक व्यवसायामध्ये कृषी पर्यटन हा सर्वात महत्वाचा व्यवसाय असून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याचे मत ॲग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चप्पलवार यांनी व्यक्त केले. ते धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित विशेष युवक शिबिरात बोलत होते.
देगलूर (नांदेड) : शेतीपूरक व्यवसायामध्ये कृषी पर्यटन हा सर्वात महत्वाचा व्यवसाय असून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याचे मत ॲग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चप्पलवार यांनी व्यक्त केले. ते धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित विशेष युवक शिबिरात बोलत होते. यावेळी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे प्राध्यापक भास्कर कोशिडगेवार, काठेवाडी गावाचे सरपंच सूर्यकांत पोतुलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. सतीश जांभाळीकर, महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेश चप्पलवार म्हणाले, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाची कास धरली आहे. अनेक तरुण शेतकरी यशस्वीपणे कृषी व ग्रामीण पर्यटन चालवत असून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ते आपल्या शेत मालाची विक्री करत आहेत. त्यामुळे कृषी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाचे भविष्य उज्ज्वल आहे. कृषी पर्यटनामुळे पर्यटन विकास व पर्यावरण रक्षण होण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांना कृषी पर्यटनाची गरज असल्याने शेतकऱ्याने आपली शेती जपण्यासाठी त्यामध्ये नवीन प्रयोग करून कृषी पर्यटनाकडे वळावे असे आवाहन करत विविध संस्थांच्या आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नव-नवीन व्यवसायाची माहिती घ्यावी असे गणेश चप्पलवार यांनी सांगितले.
प्रारंभी ॲग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चप्पलवार यांचा महाविद्यालयातर्फे प्रा. भास्कर कोशिडगेवार यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सतीश जांभाळीकर यांनी मानले.
Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...
