म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे
म्हसवड (ता.माण) नगरपालिकेला ८ दिवसांतून एकचवेळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्यामुळे येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची होत असलेली गैरसोय थांबवण्यासाठी उरमोडी, जिहे कटापुर प्रकल्पातील पाणी माण नदीत सोडून बंधारे भरून घेण्याची मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
म्हसवड नगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ८ दिवसांतून एकचवेळ केला जात असल्यामुळे येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण चालू आहे. वाडीवस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. उरमोडी किंवा जिहे कटापुर प्रकल्पातील पाणी माण नदीमध्ये सोडल्यास बंधारे भरतील, पाण्याची पातळी वाढेल, विहीर आणि बोअरला पाणी आल्यावर पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे खासदार मोहिते-पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
येरळवाडी तलाव भरणे गरजेचा
येरळवाडी (ता.खटाव) येथील येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाऊसमान कमी आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी, औद्योगीकरणासाठी, शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज भासणार असल्यामुळे येरळवाडी प्रकल्पामध्ये उरमोडी, जिहे कटापूर प्रकल्पामधून पाणी सोडून येरळवाडी तलाव भरणे गरजेचे असल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी दिलेल्या दुसर्या पत्रात नमूद केले आहे.

येरळवाडी मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ३२.८० दलघमी आहे. या प्रकल्पात सध्या ३३% पाणी साठा उपलब्ध आहे. ४५ गावांच्या पाणी पुरवठा योजना, औद्योगीक वसाहतीसाठी लागणारे पाणी, लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी लागणारे पाणी या प्रकल्प आराखड्यामध्ये सामाविष्ठ असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास पत्राद्वारे आणून दिले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
