माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला संसदेत पाठवा
फलटण : महाराष्ट्राच्या राजकारणात तीच घरांनी तेच चेहरे यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना राजकीय सत्तेची संधी मिळत नाही. सततच्या राजकीय सत्तेमुळे तीच घराणी हुकुमशहा झाल्यासारखे वाटतात परिणामी सामान्य माणूस राजसत्तेपासून कोसोदूर राहिला असल्याची खंत व्यक्त करीत आपण माढा लोकसभा मतदारसंघात उभा राहिलो असून माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला संसदेत जाण्याची संधी मतदारराजांनी द्यावी, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार काशिनाथ देवकाते यांनी केले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार काशिनाथ देवकाते प्रचाराच्यानिमित्ताने फलटण तालुका दौऱ्यावर होते यावेळी येथील माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.
काशिनाथ देवकाते पुढे म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली राज्यकर्त्यांनी गावगाड्यात कलह निर्माण केला आहे. मी शिक्षित उमेदवार असून अनेक आंदोलनांचा मला अनुभव असल्याने मराठा, धनगर समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने फक्त मीच सोडवू शकतो. माझ्यासमोर उभे असलेले दोन्ही उमेदवार हे घराणेशाहीतील आहेत. ते कधीही जनतेत गेलेले नाहीत. त्यांचा जनसंपर्क कमी आहे. ते दोघे एकाच पक्षाचे आहेत. त्यांच्यावर जे लोक नाराज आहेत ते माझ्या मागे उभा असून मला ताकदीने लढण्याचं पाठबळ देत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात मी सहा तालुक्यात फिरत आहे. जनता मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. या मतदारसंघात ते दोघे (धैर्यशील मोहिते पाटील, खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर) आणि मी अशी तिरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून मी १ लाख ४० हजार मतांनी निवडून येईल असा मला विश्वास आहे. मी पाटबंधारे खात्यातील अधिकारी आहे. मी उजनी धरणावर काम केलं आहे. निरा-देवघरवर काम केलं आहे. कुकडी प्रकल्प यावर काम केलं आहे. त्यामुळे पाण्याचे गणित मला चांगलं माहित आहे. जे उमेदवार स्वतःला पाणीदार म्हणत आहेत त्यांना यातलं काहीही माहित नाही. या मतदारसंघातील दुष्काळी पट्ट्यातील गावात आजही टँकरने पाणी चालू असल्यामुळे तुम्ही कसले पाणीदार आहात, असा प्रश्न उपस्थित करत मतदार त्यांना काही दिवसात बंदी करतील असे देवकाते यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार प्रचंड पैशाचा वापर करीत आहे. जनतेला भुलवण्याचे काम करत आहेत. थापा, गप्पा आणि भूलथापा ह्याला मतदार वैतागला आहे. जनता त्यांच्यासोबत राहिली नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्तेत असलेल्या पक्षाला मतदारसंघातील प्रचारासाठी मोदी साहेबांना आणावं लागत आहे, यावरून ओळखून जावा की यांची अवस्था कशी झाली आहे. हे अडचणीत असल्यामुळे पैशाचा वापर प्रचंड प्रमाणात करत आहेत. परंतु याचा काहीही उपयोग होणार नाही. मतदारा हुशार झाला आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येक गाव खेड्यातील माणूस आता हुशार झाला आहे. माझी कुठलीही वैयक्तिक अपेक्षा ननसून मला फक्त जनतेचा विकास करण्याशिवाय काहीच काम नसल्याचे सांगत भारत देश बलशाली होण्यासाठी व जगात एक नंबरवर आणण्यासाठी मला संसदेत पाठवा, असा पुनरउच्चार देवकाते यांनी यावेळी केला.
मतदान प्रक्रियेत मतदान करण्यासाठी प्रस्थापित राज्यकर्ते जनतेला धमकावत आहेत. मतदारावरील त्यांच्या दबावाला मी खंबीर आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील गरीब जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न संसदेत गेल्यावर मी प्राधान्याने सोडवणार आहे. गरिबांचे नेतृत्व करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही निर्माण केली आहे. लोकशाहीतील राजकीय संस्कृतीचे पालन उमेदवारांनी नीटपणे करावे. लोकशाही आणि संविधान राहण्यासाठी मतदारांनी डोळसपणे मतदान करणे अनिवार्य असल्याचा सल्ला देत मायबाप जनतेने मला संसदेत पाठवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देवकाते यांनी यावेळी केले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
