पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी 'एक कुटुंब एक झाड' मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पुरवठा माहिती अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.
वैशाली राजमाने म्हणाल्या, तालुक्यातील शासकीय धान्याचा लाभ घेणाऱ्या पात्र कुटुंबाची संख्या विचारात घेतली जाणार असून पात्र कुटुंबांसाठी देशी प्रजातीच्या झाडांची रोपे स्थानिक पातळीवर विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. यामध्ये चिंच, जांभूळ, लिंब, उंबर, वड, पिंपळ, बांबू, कोरफड, तुळस, गावती चहा आदी रोपांचा समावेश आहे. उपलब्ध होणारी रोपे रास्त भाव दुकानदारांमार्फत ग्रामीण भागातील कुटुंबाला मोफत देणे, १५ ऑगस्ट २०२३ रोजी रोपांची सुनिश्चित ठिकाणी लागवड करणे, रोपांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कुटुंबावर देणे यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
पुणे विभागातील सर्व रास्त भाव दुकाने, गोदामे, पुरवठा विभागाची कार्यालये यांना आयएसओ मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे, यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार, पुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. केंद्र व राज्यातील सरकारने या नाविन्यपूर्ण योजनेची दखल घेऊन सदर योजना संपूर्ण देशभर राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजमाने यांनी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...
तापमान वाढ नियंत्रणावर वृक्ष लागवड प्रभावी उपाय : श्रीमंत रामराजे
एकता दर्शन : वृक्ष लागवड व संवर्धन हे जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण करणारा प्रभावी उपाय आहे. झाडे लावावीत, जगवावीत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवड अभियान व्यापक...
