वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय गोदामातील शेतमालाची विक्री केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत गोदामाच्या भाड्यात शेतकऱ्यांना ५० टक्के सूट देण्यात आली असून वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ व्यापारी व शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन वखार महामंडळाचे साठा अधिक्षक समीर नाडगौडा यांनी केले.
येथील वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात आयोजित जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्यात नाडगौडा बोलत होते. यावेळी कॉसमॉस बँक व्यवस्थापक प्रवीण देशमुख, राज्य सहकार महामंडळ शेतमाल तारण व्यवस्थापक प्रशांत चासकर, फोर्टिस कंपनीचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र हजारे, तंत्रज्ञान व्यवस्थापक रणदिवे, श्रीमती शीला घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यापारी व शेतकरीवर्गाला मार्गदर्शन करताना समीर नाडगौडा म्हणाले, शेतकऱ्यांना विविध सवलती देण्याचे वखार महामंडळाचे धोरण आहे. उत्पादित शेतमाल शासकीय गोदामात ठेवणाऱ्या कंपन्यांनाही २५ टक्क्यांची सूट व ९ टक्के व्याजदराने तात्काळ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतमालाचे बाजारभाव वाढीनंतर संबंधितांनी आपला शेतमाल विकून आर्थिक उत्पन्न वाढवावे.
या शेतकरी कार्यशाळेत गोदाम उभारणी, व्यवस्थापन तंत्रज्ञान, गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना आदींची माहिती देण्यात आली. कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेस विविध गावातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट फेडरेशन, सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ फलटण तालुका व्यवस्थापक, तालुक्यातील शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...
तापमान वाढ नियंत्रणावर वृक्ष लागवड प्रभावी उपाय : श्रीमंत रामराजे
एकता दर्शन : वृक्ष लागवड व संवर्धन हे जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण करणारा प्रभावी उपाय आहे. झाडे लावावीत, जगवावीत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवड अभियान व्यापक...
