राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करणारी कृती भाजपाचे राजकीय षडयंत्र : डॉ.सचिन सूर्यवंशी
एकता दर्शन : विरोधी पक्ष हि भारतीय लोकशाहीतील संजीवनी असून विरोधी पक्षांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो, मात्र अलीकडच्या काळात केंद्रातील भाजप सरकार विरोधकांना बोलूच देत नाही. भारतीय लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करणारी कृती हे भाजपाचे राजकीय षडयंत्र असल्याने या कृतीचा फलटण शहर व काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध करीत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी डॉ.सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द केलेच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सचिन सूर्यवंशी बोलत होते. यावेळी फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, फलटण तालुका कार्याध्यक्ष अमिरभाई शेख, फलटण ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, फलटण शहर उपाध्यक्ष अशोकराव शिंदे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गंगाराम रणदिवे, युवक काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे, अल्पसंख्यांक विभाग फलटण शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, फलटण तालुका सरचिटणीस मनोहर गायकवाड, अनुसूचित जाती-जमाती सेल फलटण तालुकाध्यक्ष अभिजित जगताप, ओबीसी सेल शहराध्यक्ष विकास ननवरे, फलटण तालुका खजिनदार बालमुकुंद भट्टड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन सूर्यवंशी पुढे म्हणाले, देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून दोन उद्योगपती देश चालवीत आहेत. मोदी आणि शहा या उद्योगपतींना अभय देत आहेत. या उद्योगपतींच्या माध्यमातून मिळणारा पैसा भाजप पक्ष वापरत आहे म्हणूनच विरोधकांनी उद्योगपतींचा विषय संसदेत घेतल्यावर सरकार प्रश्नाचे उत्तर देत नाही. विरोधकांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, मात्र सरकार का घाबरते. सरकारने प्रश्नांची उत्तरे दिली तरच हे लोकशाहीतील सरकार असल्याचे म्हणता येईल. भारतीय नागरिक कर रूपाने सरकारच्या तिजोरीत पैसा देत आहे. त्या पैशांचा हिशोब मागितला तर सरकारने दिला पाहिजे.
भाजपाने राहुल गांधींची खासदारकी रद्द करून त्यांची नाहक बदनामी केली आहे. सध्या भाजपाचे काँग्रेसवर आकांड तांडव सूरू आहे. विद्यमान केंद्र सरकारने आपल्या कामाची पद्धत विरोधकांना विश्वासात घेऊन सुधारली पाहिजे अन्यथा आगामी काळात देश, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर भाजप विरोधी आंदोलने करण्यात येतील असा इशारा सचिन सूर्यवंशी यांनी यावेळी दिला.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
