शिक्षणातील बदलाची आव्हाने स्वीकारली पाहिजेत : प्रा.रमेश आढाव
एकता दर्शन, फलटण : ज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक शिक्षणात होणाऱ्या बदलाची आव्हाने स्वीकारून खाजगी व सरकारी शाळांतील अद्यापकांनी विद्यार्थ्यांना अद्यापन करणे अनिवार्य असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीबरोबरच सामान्य ज्ञान प्रगतीच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केले.
विघ्नहर्ता क्लासेसमधील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ कोळकी (ता.फलटण) येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केला होता, याप्रसंगी प्रा.आढाव बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन गोसावी, माझेरी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भोईटे मॅडम, निलेश शिंदे (वाई), ज्येष्ठ नागरिक संघाचे रामचंद्र शेडगे, आनंदराव शिंदे, सदाशिव खरात यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते.
प्रा.आढाव म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आचार विचार संस्कार केंद्रबिंदू मानुन शिक्षण व्यवस्थेतील घटकांनी विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे. बौद्धिक क्षमता व गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास शिक्षण प्रक्रियेच्या कालखंडात विद्यार्थी परिपूर्ण विकसित होईल परिणामी आजची पिढी भविष्यात सक्षमपणे उभी राहिल. राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील 'विघ्नहर्ता'मधील विद्यार्थ्यांचे यश उल्लेखनीय असल्याचे सांगत कुलकर्णी दाम्पत्य शिक्षण वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अंकगणित कौशल्य समृध्द व्हावे, विद्यार्थ्यंमधील आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहेत.

अध्यक्षीय भाषणात सचिन गोसावी म्हणाले, शिक्षकाच्या आचार विचारांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर होत असतो. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या संस्कारात शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान असते. शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आगामी काळात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे क्रयशक्ती कमी होते. कुलकर्णी दाम्पत्य सेवाभावी व्यक्तीमत्व असून सक्षम विद्यार्थी घडविण्याकडे त्यांचा कल पहिल्यापासूनच राहिला आहे. पैशांपेक्षा विद्यार्थ्याचा बुध्यांक वाढविण्यात व घडविण्यात त्यांना सर्वाधिक आनंद असतो. पालकवर्गाने अशा सेवाभावी काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.
दरम्यान, राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापिका भोईटे मॅडम, निलेश शिंदे (वाई), रामचंद्र शेडगे, आनंदराव शिंदे, सदाशिव खरात, मनोज आढाव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कल्याणी कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अविनाश कुलकर्णी मानले. कार्यक्रमास कोळकी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
