जातीवादाचे विष मातीत गाढा : खासदार रणजितसिंह
एकता दर्शन : देशातील महापुरुषांनी भारतीय म्हणून काम केले मात्र विविध जाती समूहांनी त्यांना जातीमध्ये बंदिस्त केले. आजही विविध जाती समुहाच्या बैठका होताना दिसत असल्याचे सांगत या सर्व घडामोडी देशाची एकता भंग करणाऱ्या असून सर्वांनी एकत्रित येऊन जातीवादाचे विष मातीत गाढा असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निमित्त फलटण येथील आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका संघर्ष समितीचे ॲड.नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, धनंजय साळुंखे-पाटील, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, प्रा.रवींद्र कोकरे, महिला आघाडीच्या सौ.उषा राऊत, जिल्हा सरचिटणीस सौ.मुक्ती राहुल शहा, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
खासदार रणजितसिंह म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे सावरकर यांच्यावर टीका करणारांनी अभ्यास करून बोलावे. कोणत्याही धर्माने जातीवाद शिकवला नाही. अलीकडे समाजात विविध गट निर्माण व्हायला लागले आहेत. विविध जाती, धर्म, पंथ देशात आनंदाने एकत्रित नांदले पाहिजेत.
कोणत्याही घटकाने जातीवाद मानूच नये, यातून भारतीयांचे एकीकरण होण्यास मदतच होईल. समाजातील वाद देशाची एकता व अखंडतेला मारक ठरत असल्याने समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्याला बाजूला करणे आजची गरज आहे. राजकीय स्वार्थ साधनाऱ्या राज्यकर्त्यांनी जातीवाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.
सध्या देशात भाजपाचे सरकार आहे. केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या भागात कोट्यवधींचा निधी आणला आहे. समाजातील विविध घटकांना याचा लाभ होत आहे. विकास प्रक्रियेत सर्वांगीण विकास हि आपली मनापासूनची धारणा आहे. सर्वांचा विकास हाच आपला ध्यास असा संकल्प केला आहे. आज समाजातील विविध घटक आपली ओळख करून देताना मी या जातीचा, मी त्या धर्माचा असे अभिमानाने सांगत असल्याचे चित्र दिसत आहे, मात्र देशातील सर्व समाज घटकांनी भारतीय म्हणूनच आपली ओळख सांगावी अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान प्रा.रवींद्र कोकरे यांनी भाषणातून स्वातंत्रवीर सावरकर यांचे जीवन चरित्र सांगितले. ॲड.नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, डॉ.प्रवीण आगवणे, संतोष सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी खासदार रणजितसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत मलठण येथील शंभू महादेव मंदिरापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सतीश जंगम यांनी केले. आभार भाजपचे शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी मानले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
