जल आयोगाच्या मान्यतेमुळे फलटण तालुक्यातील पाण्याचा वनवास संपला
एकता दर्शन, फलटण : पाणीप्रश्नावर ५०-६० वर्षात अनेक घोषणा झाल्या, मोठं राजकारणही झालं, असं असलं तरी उशिरा का होईना निरा देवधर प्रकल्पास केंद्रिय जल आयोगाची मान्यता मिळाल्याने पाण्याचा प्रश्न कायमाचा निकालात निघाल्यामुळे आता यापुढे फलटण तालुक्यातील पाण्याचा वनवास संपला असल्याचा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
निरा देवधर प्रकल्पास केंद्रिय जल आयोगाची (CWC) मान्यता मिळाली असल्याच्या पार्श्वभूमीवर कोळकी (ता.फलटण) येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती, याप्रसंगी खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड.नरसिंह निकम, अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधानांमुळे मेलेला प्रकल्प जिवंत
खासदार रणजितसिंह म्हणाले, निरा देवघर कामासाठी ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीची केंद्रीय जल आयोगाची (सेंट्रल वॉटर कमिशन) परवानगी मिळाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या परवानगीशिवाय केंद्र सरकार धरणाला गुंतवणूक करत नाही. आता 'सीडब्ल्यूसी'च्या मान्यतेनंतर केंद्र सरकारचा इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स पुढच्या दहा दिवसात मी मिळवून घेईन. ३ हजार कोटींचा इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स मिळाला की टप्प्या-टप्प्याने केंद्र सरकार संपूर्ण पैशांची जबाबदारी उचलेल. त्यामुळे राज्य सरकारला आता पैसे द्यावे लागणार नाहीत. या 'सीडब्ल्यूसी'च्या मान्यतेला पंतप्रधान महोदयांनी निर्देशित केले, त्यांच्या निर्देशामुळेच मेलेला प्रकल्प जिवंत झाला.
नीरा देवघरचे नकारात्मक चित्र पुसण्यात यशस्वी
२० वर्षात अनेक वेळा नीरा देवघरची फाईल कचऱ्यामध्ये टाकली गेली होती. नीरा देवघरचे नाव काढले की अनेक लोकांना एलर्जी यायची. निरा देवघरला कधीही 'सीडब्ल्यूसी'ची मान्यता मिळणार नाही, कधीही त्याला विश्वासार्हता मिळणार नाही, या धरणाच्या कालव्याला कधीही पैसे मिळणार नाहीत अशा वल्गना केल्या जात होत्या. महाराष्ट्रामध्ये निरा देवघरच्या विषयाचे नकारात्मक चित्र तयार करण्यात आलं होतं, ते चित्र पुसण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे सांगत निरा देवघरच्या सहा निविदा प्रसिद्ध होणार असून दोन निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत, दोन निविदा प्रसिद्ध होतील, आणि उर्वरित दोन निविदा सुद्धा पुढच्या १० दिवसात निघतील असे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रकल्प
रणजितसिंह पुढे म्हणाले, हा प्रकल्प अंदाजे १५ ते २० हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत एवढा मोठा प्रकल्प कधीही घेण्यात आला नव्हता. हा प्रकल्प संपूर्ण फलटण, खटाव, मान तालुका व माढा लोकसभा मतदारसंघातील भविष्यातले सिंचन चित्र बदलून ठेवणार आहे. मला न होणारी चॅलेंजिंग कामे करायची सवय आहे. चार वर्षातील खासदारकीच्या काळात धोम बलकवडी, निरा देवघर, रेल्वे मार्ग, रस्त्यांचे प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न दिलेली सर्व आश्वासने कागदावर पूर्ण झाली आहेत, एकही आश्वासन अर्धवट राहिले नाही. भविष्यात २०२४ नंतर 'पाणी' हा विषय संपलेला असेल, आणि आपला भाग सिंचन खालचा भाग म्हणून ओळखला जाईल.
फडणवीसांच्या आशीर्वादाने पाण्याचा लढा संपला
नीरा देवघर प्रकल्पाला 'सीडब्ल्यूसी'ची मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परमेश्वरासारखे प्रकल्पाच्या पाठीमागे उभे राहिले. नुसते उभे राहिले नाहीत तर रणजितसिंह यांनी घेतलेला विडा हा त्यांनी उचलला त्यामुळेच मी त्यांना परमेश्वराची उपमा देतो. हा लढा हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी चालू केला होता, मी तो पुढे नेला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हा लढा संपला. तालुक्याला 'सीडब्ल्यूसी'ची मान्यता काय असते हे पत्रकारांनी समजून सांगणे गरजेचे असून या तालुक्याला पुन्हा कुणाकडे अपेक्षेने बघण्याची गरज लागणार नसल्याचे सांगत मतदारांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे, असे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
