शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकास अधिक गतीने होतो : सचिन मोरे
एकता दर्शन, फलटण : विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेतून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या शालेय जीवनात वेळेचा सदुपयोग करणे अनिवार्य असून जिद्द, चिकाटी, अविश्रांत परिश्रम आदी गुणांची सोबत केल्यास प्रभावी व्यक्तिमत्व तयार होत असल्याचे सांगत शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास अधिक गतीने होतो असे मत राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांनी व्यक्त केले.
येथील नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.दिपक राऊत, प्रा.बी.एम. तुपे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव आदी प्रमुख उपस्थित होते.
सचिन मोरे म्हणाले, "व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या अंतर्बाह्य क्षमता व गुणांचे संघटन असते. विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची क्षमता, बलस्थान, अभियोग्यता, अभिक्षमता, अभिरुची यांची माहिती होईल तेव्हाच त्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे सोपे जाईल. प्रभावी व्यक्तिमत्व हे वरदान नसून ते प्रयत्नांतून प्राप्त केले जाते. व्यक्तिमत्त्वाच्या आंतरिक गुणांमध्ये बुद्धिमत्ता, समायोजन क्षमता, सकारात्मकता, आत्मविश्वास, जिज्ञासा, संवाद कौशल्य, सृजनशीलता, धाडस आदी गुण आवश्यक आहेत. व्यक्तिमत्व विकास आपल्या यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान आदी क्षेत्रांत प्रभावी व्यक्तिमत्व विकसित होताना दिसत आहेत, तीच प्रेरणा आणि उर्जा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अल्बर्ट आइन्स्टाइन, ए.पी.जे. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर या यशस्वी कर्तृत्वान व्यक्तिमत्त्वांचे प्रोजेक्टर व तंत्रज्ञानाच्या मदतीने दाखले देत मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डॉ. संदेश बिचुकले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.आरती शिंदे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.दिपक राऊत यांनी केले व आभार प्रा.बी.एम. तुपे यांनी मानले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
