माढा, बारामती लोकसभा मतदारसंघात उभा राहणार
आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे करणार आहे. 'जिंकू किंवा हरू' मात्र आपला पक्ष मैदान सोडणार नाही असे सांगत आपण स्वतः माढा व बारामती लोकसभा मतदारसंघात उभे राहणार असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी फलटण येथे केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांची जन सुराज यात्रा आयोजित केली होती, त्याचा समारोप येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झाला याप्रसंगी आमदार जानकर बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे केंद्रीय मुख्य सचिव सुशीलकुमार पाल, राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब लेंगरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा विरकर, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, प्रदेश मुख्य सचिव ज्ञानेश्वर सलगर, भाऊसाहेब वाघ, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरद दडस, माण बाजार समितीच्या उपसभापती सौ.वैशाली वीरकर, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विष्णू गोरे, युवक अध्यक्ष अजित पाटील, श्रीकांत देवकर, तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण, युवा अध्यक्ष संतोष ठोंबरे, महिला आघाडीच्या निशा माने यांच्यासह रासपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केल्यापासून आम्ही अनेक निवडणुका स्वबळावर पक्षाच्या चिन्हावर लढवल्या, त्यामुळेच पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहिले. अन्य पक्षाबरोबर युती केली असेल मात्र स्वतःच्या चिन्हावरच लढलो. मतांची टक्केवारी वाढवत अन्य राज्यातही निवडणुकांना सामोरे गेलो. महात्मा फुले यांच्या विचारांची व गरिबांची भाषा करणाऱ्या भाजपबरोबर आम्ही युती केली. मात्र, त्यांच्या कमळावर कधीच लढलो नाही. आपण आत्महत्या करू पण कमळावर लढणार नसल्याची ग्वाही देत झेंडे आणि पक्ष बदलण्याचे प्रकार कधीही केले नाहीत, पदासाठी व सत्तेसाठी अन्य पक्षात वाहत गेलो नाही आणि जाणारही नसल्याचे सांगत स्वतःच्या ताकदीवरच दिल्ली गाठणार असा विश्वास जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी कुणाच्याही दारात जाण्याची गरज नाही. आपला हक्काचा राजकीय पक्ष निर्माण केला आहे. काँग्रेस, भाजपने सर्वसामान्यांना फसवले आहे. देशात लोकशाही संविधान असूनही मतदारांना या पक्षांनी गुलाम केले असल्याचा आरोप करीत जातीनिहाय जनगणना का होत नाही असा प्रश्न उपस्थित करत आकडेवारी कळेल म्हणूनच जातीय जनगणना केली जात नसावी असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान सुशीलकुमार पाल, बाळासाहेब लेंगरे, काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, विष्णू गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक संतोष ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन पुरंदर तालुकाध्यक्ष संजय निगडे यांनी केले. सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांनी आभार मानले.
पाणी दिले म्हणजे उपकार केले नाहीत
सत्ताधारी भाजपचे खासदार आम्ही पाणी आणले, रस्ते केले, अन्य सुविधा दिल्याच्या बाता मारतात. सोयीसुविधा दिल्या म्हणजे उपकार केले नाहीत. सरकारच्या पैशानेच सोयीसुविधा दिल्या जात असतात आणि विकास कामे करणे लोकप्रतिनिधींचे कामच असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
