सर्व धर्मातील नागरिकांनी भारतीय म्हणून वावरले पाहिजे : डॉ.प्रभाकर पवार
फलटण प्रतिनिधी : विविध जाती धर्म पंथीयानी नटलेल्या लोकशाही भारत देशात संविधानाने प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य दिले असले तरी या सर्वधर्मीयांतील प्रत्येक घटकांनी भारतीय नागरीक म्हणून वावरले पाहिजे असल्याचे सांगत शिक्षणातून संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग देशातील एकता आणि अखंडता कायम राखण्यात झाला पाहिजे असे मत मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रभाकर पवार यांनी व्यक्त केले.
येथील लुंबिनी बहू उद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनात दहावी-बारावी बोर्ड परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी डॉ.पवार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, प्रा.स्वरूप अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, वैशाली सुधीर अहिवळे, ज्येष्ठ रिपाई नेते मधुकर काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थांनी दर्जेदार शिक्षण घ्यावे, परीक्षेतून प्रशासनातील मोक्याच्या जागा हस्तगत कराव्यात यातून आर्थिक सुधारणा होईल, आर्थिक स्थैर्यातून सामाजिक सुधारणा घडेल, परिणामी सामाजिक बदल होण्यास मदत होणार असल्याचे सांगुन सामाजिक चळवळींना विचारांची किनार असली पाहिजे या सर्व बाबी उच्च शिक्षणातूनच घडतील असा विश्वास डॉ.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा.रमेश आढाव म्हणाले, विद्यार्थ्यांसमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श असून त्यांनी ज्याप्रमाणे प्रतिकूल आर्थिक सामाजिक परिस्थितीशी दोन हात करुन जगात नाव कमावले त्या डॉ.बाबासाहेबांच्या शिक्षणातील कर्तृत्वाचा विसर विद्यार्थ्यांना पडता कामा नये. अनुकूल आचार विचार संस्कारातुन तरूण पिढी घडावी. त्यांच्या हातून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून गोरगरीबांची सेवा घडावी. कृतिशील विचारातून कुंटुब सुधारते पर्यायाने एकसंघ समाजव्यवस्था बळकट होण्यास मदत होते यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांवर पालकांबरोबरच समाजानेही लक्ष ठेवणे अनिवार्य आहे.
यावेळी प्रा.प्रफुल्ल अहिवळे, सचिन अहिवळे, दत्ता अहिवळे, मुकेश अहिवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दहावी बारावी परिक्षेत विशेष गुणवताप्राप्त केलेल्या विद्यार्थांचा संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व भेटवस्तू देवुन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, डॉ.प्रा.वर्धमान अहिवळे, संजय मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. "समाजभूषण" पुरस्कार देवुन दत्ता अहिवळे यांना सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कुणाल काकडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ.वैशाली संदिप कांबळे यांनी केले. आभार गौतम अहिवळे यांनी मानले.
कार्यक्रमास सुपर्णा सनी अहिवळे, सपना भोसले, प्रिर्यदर्शनी सावंत, शाम अहिवळे, हरीश काकडे, राजेंद्र काकडे, संस्थेचे पदाधिकारी सुरज काकडे, वैभव काकडे, शिवेंद्र कांबळे, अभिलाष काकडे, हेमंत काकडे, सुशांत काकडे, अजय जगताप, सागर भोसले यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
